Monday, December 28, 2020

#हरभरा #घाटे #अळी #नियत्रंण :

 


#हरभरा #घाटे #अळी #नियत्रंण : 

सद्यपरिस्थितीत #ढगाळ वातावरणामुळे हिरव्या पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो .

#शेतक-यांनी #पिकाचे निरीक्षण करून  किडींचा #प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा ४० ते ५० टक्के पीक फुलोच्यावर आल्यानंतर सर्वप्रथम #वनस्पतिजन्य किंवा #जैविक  #कीटकनाशकांना #प्राधान्य द्यावे. त्यासाठी पहिली फवारणी #निंबोळी #अर्क ५ टक्के किंवा #ऑझंड़ीरेंक्टीन ३०० #पीपीएम ५०#मिलि. प्रति १०  #लिटर पाणी किंवा

खालील कोणत्याही एका कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून #साध्या (#नॅपसॅक) #पंपाने #फवारणी करावी. 

#पावर पंपाने फवारणी करायची असल्यास कीटकनाशकांचे #प्रमाण #तिप्पट करावे. 

#आवश्यकता भासल्यास #दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.


१) #क्रेिनॉलफॉस २० टक्के प्रवाही २० मिलिं.


२) #इमामेक्टिन #बेंझोएट ५ टक्के ३ ग्रॅम


३) #डेल्टामेश्रीन २.८ टक्के प्रवाही १० मिलेि. 


४) #लॅमडा #साथहॅलोमेश्रीन ५ टक्के प्रवाही १० मिलेि.


५) #क्लोरेंट्रेनिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही ३  मिली      

    

अधिक माहिती साठी संपर्क

📲*https://bit.ly/2miyhzj*


#स्विकृती_अॅग्रो_क्लिनिक #swikrutiagro #swikrutiagroclinic #agro #agri #agriculture  #agriculturelife #agribusiness #agricultural

Sunday, November 22, 2020

#मिरची_लागवड



 #मिरची_लागवड :-

-मिरची हे महाराष्ट्रातील महत्वाचे पीक आहे ,सध्यपरिस्थितीत महाराष्ट्रात सर्वत्र हे पीक घेतले जाते, मिरचीमध्‍ये अ. व क. जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍याने मिरचीचा संतुलीत आहारात समावेश होतो. तिखटपणा व स्‍वाद यामुळे मिरची हेक्‍टरी महत्‍वाचे मसाल्‍याचे पिक आहे.

#लागवडीचा_हंगाम_व_जमीन :-

खरीप लागवड जून-जुलै, तर उन्हाळी लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करावी.

मिरची लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. पावसाळयात तसेच बागायती मिरचीसाठी मध्‍यम काळी आणि पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी जमिन निवडावी. उन्‍हाळयात मध्‍यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्‍या जमिनीतही मिरचीचे पिक चांगले येते.

हिरव्या मिरचीसाठी ज्वाला, एन. पी. - 46-ए या जाती, तर पिकलेल्या लाल मिरचीसाठी सी. ए. 960, पंत सी-1, जी-3, अग्निरेखा, तेजस, फुले सूर्यमुखी, फुले ज्योती, अर्का लोहित, कोकणकीर्ती या जातींची निवड करावी. उन्हाळी लागवडीसाठी ज्वाला आणि एन. पी. - 46 या जातींची निवड करावी. रोपवाटिकेत रोपे तयार करून 45 दिवसांनी पुनर्लागवड करावी.इतर लोकल कंपनी चे वाण बाजारपेठेत उपलब्ध आहेत (आपल्या विभागात बाजारपेठेत मागणीनुसार वाणाची निवड करावी )

-एकरी बियाणे ४०० ते ६०० ग्राम 

-लागवडीसाठी अंतर उंच आणि पसरट वाढणा-या जातींची लागवड ६० बाय ६० सेमी अंतरावर आणि बुटक्‍या जातींची लागवड ६० बाय ४५  सेमी अंतरावर करावी. कोरडवाहू मिरचीची लागवड ४५ बाय ४५  सेमी अंतरावर करावी. रोपांची सरीवरंबा पध्‍दतीवर लागवड करावी.

- रोपे गादीवाफयातून काढल्‍यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे १०  लिटर पाण्‍यात २० मिली क्लोरोपायरीफॉस + २५  ग्रॅम एम ४५  +३० ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक ८० टक्‍के मिसळलेल्‍या द्रावणात बुडवून लावावेत.

#खत_व्यवस्थापन_व_रोग_किडी_व्यवस्थापन :-

पूर्वमशागत करताना जमिनीत १२ ते १४ गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे .

- गादीवाफे तयार करताना त्यामध्ये शिफारशीनुसार १८:४६:०० -१०० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो +निंबोळी खत २०० किलो + कोसावेट ३ किलो एकरी द्यावे.

- गादीवाफा ओला करून घ्यावा लागवड वापसा अवस्थेत करावी रोप लावल्यानंतर कडेची माती चांगली दाबून घ्यावी.३ दिवसानी पाणी देऊन घ्यावे.पाणी नियमित द्यावे (पोतानुसार) 

- ५ व्या दिवशी ठिबकमधून अक्टरा /अरेवा २५० ग्राम + ब्लू कॉपर- ५०० ग्राम + ह्यूमिक ९९ टक्के  ५०० ग्राम द्यावे.

- विद्राव्य खत ठिबकमधून  १९:१९:१९ -३ किलो + युरिया १.५ किलो ३ दिवसाच्या अंतराने ८ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५ ते ३० दिवस )

- ७ व्या दिवशी फवारणी एम ४५- ३० ग्राम + असाटाफ ३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- १० व्या दिवशी पिवळे चिकट सापळे ५ व निळे चिकट सापळे ५ लावावे चिकट सापळे यावर असलेल्या किडीचा प्रादुर्भाव नुसार फवारणी करावी.

- पुढील फवारणी रोग व किडी प्रादुर्भाव नुसार कीटकनाशक व बुरशीनाशक वातावरणातील बदलानुसार आलटून पालटून फवारणी घ्यावी.रसशोषक  किडींसाठी इमिडेक्लोप्रीड फवारावे.फळपोखरणारी अळी प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर खराब झालेली फळे काढून टाकावी व नष्ट करावी. नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ४५ एस सी (Tracer) ७ मिलि किंवा सायंट्रेनिलिप्रोल १०.२६% ओ.डी.(Benevia) १५ मिलि किंवा अलिका १० मिली १५ लीटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. केवडा, भुरी ,मर या बुरशीजन्य रोगांसाठी साफ किंवा अवतार किंवा एम ४५ फवारावे. एकच औषध पुन्हा पुन्हा न फवारता आलटून पालटून आवशकतेनुसार फवारावे. 

- १५ व्या दिवशी सिलिकॉन ३० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी १५ दिवसाच्या अंतराने काढणीपर्यंत करावी.

-२५व्या दिवशी अलिका १० मिली + स्कोर ८ मिली /१५ लिटर

-विद्राव्य खत ठिबकमधून १२:६१:०० -३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ८ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून २५ ते ५० दिवस )

-३२व्या दिवशी कोसावेट ३ किलो + मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो ठिबकमधून द्यावे.

-४० व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो ठिबक मधून द्यावे त्यानंतर २ दिवसांनी बोरॉन १५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.(१२:६१:०० बरोबर देऊ नये )

-४५ दिवशी ट्रॅकोडर्मा ठिबकमधुन सोडावे.

- विद्राव्य खत ठिबकमधून १३:४०:१३ -४ किलो किंवा  (१२:६१:०० २ किलो + १३:००:४५ -२ किलो ) ४ दिवसाच्या अंतराने आवश्यकते प्रमाणे द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५० ते ११० दिवस )

-५५ व्या व ६५ व्या दिवशी टाटा बहार ३० मिली + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य १५ ग्राम / १५ लिटर 

- ५५ ते ६० दिवसादरम्यान झाडांना मातीची भर देऊन घ्यावी.

- ६० ते ६५ व्या दिवशी ह्यूमिक ९९ टक्के  ५०० ग्राम ठिबकमधून द्यावे 

-आवश्यक फवारणी मिरची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी मिरची फळ आल्यानंतर  कॅल्शिअम नायट्रेट ३ ग्राम + बोरॉन १ ग्राम प्रति लिटर  १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी 

-७२ व्या दिवशी ओबेरोन १५ मिली /१५ लिटर

-८५  दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो ठिबक मधून द्यावे त्यानंतर २ दिवसांनी बोरॉन १५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.(विद्राव्य खताबरोबर देऊ नये )

-वातावरणातील रोग व किडी सध्यपरिस्थितीनुसार फवारणी घ्यावी

#काढणी_व_उत्पादन :-

हिरव्‍या मिरचीची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर अडिच महिन्‍यांनी सुरु होते. पुर्ण वाढलेल्‍या व सालीवर चमक असलेल्‍या हिरव्या फळांची तोडणी देठासह ८ ते १० दिवसांच्‍या अंतराने करावी. साधारपणपणे हिरव्‍या मिरच्‍यांची तोडणी सुरु झाल्‍यानंतर 3 महिने तोंडे सुरू राहातात. अशा प्रकारे १० ते १२ तोडे सहज होतात. वाळलेल्‍या मिरच्‍यांसाठी त्‍या पूर्ण पिकून लाल झाल्‍यावरच त्‍यांची तोडणी करावी.जातीपरत्‍वे ( बागायती) हिरव्‍या मिरच्‍यांचे एकरी ३२ ते ४०  क्विंटल उत्‍पादन मिळते. वाळलेल्‍या लाल मिरच्‍यांचे उत्‍पादन एकरी  ३,५  ते ४ क्विंटल निघते.

#मिरची_लागवड #लागवडीचा_हंगाम_व_जमीन #खतव्यवस्थापन_व_रोग_किडी_व्यवस्थापन #chilli_planting   

 #swikrutiagroclinic 


Swikruti Agro Clinic

https://www.facebook.com/swikrutiagroclinic/

https: /t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg

https://www.instagram.com/swikruti.agro

https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6 

 📞 https://bit.ly/2miyhzj

                                   धन्यवाद !

Tuesday, November 10, 2020

#टोमॅटो_लागवड




 #टोमॅटो_लागवड :- 

-टोमॅटो हे महाराष्ट्रातील महत्वाचे पिके आहे ,महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी टोमॅटो पीक घेता येते ,सद्यपरिस्थिती नाशिक ,पुणे,सातारा ,सांगली , नागपूर ,चंद्रपूर ,अहमदनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. 

#लागवडीचा_हंगाम_व_जमीन  :- खरीप जून -जुलै , रब्बी सप्टेंबर - ऑक्टोबर ,उन्हाळी डिसेंबर -जानेवारी.

टोमॅटो पिकासाठी मध्यम ते भारी जमीन लागवडीसाठी योग्य,पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन,सेंद्रिय खताचा भरपूर पुरवठा,जमिनीचा सामू ६ ते ८ आवश्यक.

#लागवडीसाठी_सुधारित_वाण :-पुसा गौरव ,रोमा ,अर्का विकास,फुले राजा ,पुसा रुबी,पंजाब केसरी, नामधारी २५३५.अभिनव,अविनाश,आयुष्यमान  २ ,रुपाली ,वैशाली ,इ लोकल कंपनी चे वाण बाजारपेठेत उपलब्ध आहेत (आपल्या विभागात बाजारपेठेत मागणीनुसार जातीची निवड करावी ) 

- एकरी बियाणे १०० ते १२० ग्राम 

- लागवडीसाठी अंतर खरीप व रब्बी ९० बाय ६० सेमी उन्हाळी ६० बाय ४५ सेमी .

#खत_व्यवस्थापन_व_रोग_किडी_व्यवस्थापन :-

पूर्वमशागत करताना जमिनीत १२ ते १४ गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे .

- गादीवाफे तयार करताना त्यामध्ये शिफारशीनुसार युरिया १५० किलो + सिंगल सुपर फॉस्फेट ३५० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो +निंबोळी खत २०० किलो एकरी द्यावे.

- गादीवाफा ओला करून घ्यावा या वेळेस ठिबकमधून सुडोमोनास द्यावे.रोप लागवड वापसा अवस्थेत करावी रोप लावल्यानंतर कडेची माती चांगली दाबून घ्यावी.३ दिवसानी पाणी देऊन घ्यावे.पाणी नियमित द्यावे 

- ५ व्या दिवशी ठिबकमधून अक्टरा /अरेवा २५० ग्राम + साफ / मेटको ५०० ग्राम + ह्यूमिक ५०० ग्राम द्यावे.

- विद्राव्य खत ठिबकमधून  १९:१९:१९ -३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ८ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५ ते ३० दिवस )

- ७ व्या दिवशी फवारणी एम ४५- ३० ग्राम + असाटाफ ३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- १० व्या दिवशी पिवळे चिकट सापळे ५ व निळे चिकट सापळे ५ लावावे चिकट सापळे यावर असलेल्या किडीचा प्रादुर्भाव नुसार फवारणी करावी.

- पुढील फवारणी रोग व किडी प्रादुर्भाव नुसार कीटकनाशक व बुरशीनाशक वातावरणातील बदलानुसार आलटून पालटून फवारणी घ्यावी.रसशोषक  किडींसाठी इमिडेक्लोप्रीड फवारावे.फळपोखरणारी अळी प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर खराब झालेली फळे काढून टाकावी व नष्ट करावी. नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ४५ एस सी (Tracer) ७ मिलि किंवा सायंट्रेनिलिप्रोल १०.२६% ओ.डी.(Benevia) १५ मिलि किंवा अलिका १० मिली १५ लीटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. केवडा, भुरी ,मर या बुरशीजन्य रोगांसाठी साफ किंवा अवतार किंवा एम ४५   फवारावे. एकच औषध पुन्हा पुन्हा न फवारता आलटून पालटून आवशकतेनुसार फवारावे. 

- १५ व्या दिवशी सिलिकॉन ३० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी १५ दिवसाच्या अंतराने करावी.

- ३० ते ३५ दिवसादरम्यान झाडाला वळण व आधार देणे.

- विद्राव्य खत ठिबकमधून  १२:६१:०० ३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ६ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी ३१ ते ५० दिवस )

- ३५ व्या दिवशी टाटा बहार ३० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्य २५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून १० दिवसाच्या अंतराने २ वेळेस द्यावे.

- ४५ व्या दिवशी ठिबकमधून  मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो (१२:६१:०० सोबत देऊ नये ) 

- विद्राव्य खत ठिबकमधून १३:००:४५  ३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ६ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी ५० ते ७० दिवस )

- ५० व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो ठिबक मधून द्यावे त्यानंतर २ दिवसांनी बोरॉन १५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- ६० ते ६५ व्या दिवशी ह्यूमिक पॉवर ५०० ग्राम ठिबकमधून द्यावे 

-   पुढील तोडणीला १२:६१:०० २ किलो + १३:००:४५ २ किलो या प्रमाणात विद्राव्य खते चालू ठेवावी 

#उत्पादन :- जातीपरत्वे एकरी सरासरी उत्पादन ३० ते ४५ क्विंटल येते तोडणी अगोदर ३ ते ४ दिवस आधी कीटकनाशक फवारणी करू नये ,६५ ते ७० दिवसांनी तोडणी सुरु होते.तोडणी दिवसाआड करावी.

#टोमॅटो_लागवड #लागवडीचा_हंगाम_व_जमीन #खत_व्यवस्थापन_व_रोग_किडी_व्यवस्थापन #Tomato_planting   #उत्पादन  #swikrutiagroclinic 

 Swikruti Agro Clinic

https://www.facebook.com/swikrutiagroclinic/

https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg

https://www.instagram.com/swikruti.agro

https://bit.ly/2miyhzj

Friday, November 6, 2020




 #कलिंगड_लागवड :-


#लागवडीचा_कालावधी_व_जमीन :-

उष्ण व कोरडे हवामान, भरपूर सूर्यप्रकाश या पिकास मानवते. कडक उन्हाळयाचा व भर पावसाळ्याचा काळ सोडला, तर कलिंगडाची लागवड वर्षभर कधीही करता येते.

 वेलीच्या चांगल्या वाढीसाठी २४ ते २७ अंश सेल्सियस तापमान उपयुक्त ठरते. लागवड शक्यतो जानेवारी महिन्यात करावी म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळे तयार होत असून त्यांना मागणी अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात.

 - दक्षिण महाराष्ट्रामध्ये कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तयार होतात. उत्पादन कमी येते. परंतु भाव चांगला मिळतो 

- या पिकाला मध्यम काळी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थ भरपूर असणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा.

#जाती :-

शुगर बेबी, अर्का माणिक, अर्का ज्योती व असाही यमाटो या जातींचा वापर लागवडीसाठी केला जातो. तसेच खाजगी कंपनीच्या शुगर क्वीन, किरण १, किरण २, पूनम, ऑगस्टा या जातींची लागवड बऱ्याच प्रमाणात केली जाते. एकरी ३५० -४०० ग्रॅम बियाणे लागते.

#रोपवाटिका :-

- लागवडीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा कार्बेंडाझीम २.५ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात चोळावे. कोकोपिट ट्रेमध्ये भरल्यावर बोटांच्या सहाय्याने एक छोटा खड्डा घेऊन प्रत्येक कप्प्यात एक बी पेरून कोकोपिटने झाकून घ्यावे व पाणी द्यावे.सुमारे ८ – १० ट्रे एकावर एक ठेऊन काळ्या पॉलीथीन पेपरने झाकून घ्यावेत. झाकल्यामुळे ओलावा निघून जात नाही. पाणी कमी लागते. उबदारपणा टिकून राहिल्यामुळे बी लवकर उगवून येते.रोपे उगवून आल्यानंतर ३ -४ दिवसांत पेपर काढावा व ट्रे खाली उतरून ठेवावेत.

- मर होऊ नये म्हणून दहाव्या दिवशी कॉपर ऑक्सिक्लोराईड  दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी 

- साधारणतः १६ ते १८ दिवसांनी पुनर्लागवड करावी.

#खत_व्यवस्थापन :-

पूर्वमशागत करताना जमिनीत १२ ते १४ गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे .

- गादीवाफे तयार करताना त्यामध्ये शिफारशीनुसार ,१८:४६:०० -५० किलो ,पोटॅश ५० किलो ,कोसावेट ३ किलो ,फोलिडोल ५ किलोएकरी द्यावे.

- गादीवाफ्यावर ठिबक अंथरल्यावर कलिंगड लागवडीपूर्वी  मल्चिंग पेपर (३० मायक्रॉन जाडीचा) अंथरावा. एकरी पेपरचे ४ ते ५ रोल लागतात.रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन लॅटरल आणि मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर कलिंगड लागवडीसाठी वाफ्याच्या मध्यभागी ६० से.मी. अंतरावर १० से.मी. व्यासाची छिद्रे तयार करावीत.

- गादीवाफा ओला करून घ्यावा लागवड वापसा अवस्थेत करावी रोप लावल्यानंतर कडेची माती चांगली दाबून घ्यावी.३ दिवसानी पाणी देऊन घ्यावे.पाणी नियमित द्यावे (पोतानुसार) 

- ५ व्या दिवशी ठिबकमधून अक्टरा /अरेवा २५० ग्राम + ब्लू कॉपर- ५०० ग्राम + ह्यूमिक ९९ टक्के  ५०० ग्राम द्यावे. 

- आवश्यक फवारणी सिलिकॉन ३० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून लागवडीपासून काढणीपर्यंत २० दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.

- विद्राव्य खत ठिबकमधून  १९:१९:१९ -३ किलो ३ दिवसाच्या अंतराने  ७ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५ ते २५दिवस )

- ७ व्या दिवशी फवारणी एम ४५- ३० ग्राम + असाटाफ ३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- १५ व्या दिवशी पिवळे चिकट सापळे ५ व निळे चिकट सापळे ५ लावावे चिकट सापळे यावर असलेल्या किडीचा प्रादुर्भाव नुसार फवारणी करावी.

- विद्राव्य खत ठिबकमधून १२:६१:०० -३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ५  वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून २० ते ३५ दिवस )

- २५ व्या दिवशी मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो ठिबकमधून एकरी द्यावे.

- ३० व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो + बोरॉन १ किलो या प्रमाणे द्यावे.

-३५ व्या दिवशी ह्यूमिक ९९ टक्के ५०० ग्राम ठिबकमधून द्यावे.

- विद्राव्य खत ठिबकमधून ००:५२:३४- ३ किलो - ३ दिवसाच्या अंतराने ५  वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ३६ ते ५० दिवस ) 

- ५१ व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो + बोरॉन १ किलो या प्रमाणे द्यावे.

- विद्राव्य खत ठिबकमधून किलो १३:००:४५ -३ किलो ३  दिवसाच्या अंतराने ५  वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५१  ते ६५ दिवस ) 

- ६५ व्या दिवशी पोटॅशिअम सोनाईट ५ किलो ठिबकमधून एकरी द्यावे.

#रोग_व_किडी_व्यवस्थापन :-

 - केवडा / मर - मँकोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ,भुरी - डायफेनकोनॅझोल किंवा हेक्झाकोनॅझोल.

-फळमाशी - कीड लागलेली व खाली पडलेली फळे नष्ट करावीत. क्यूल्युरचे एकरी ५ सापळे लावावेत. पिकावर व जमिनीवर मॅलॅथीऑनची ०.१ % फवारणी करावी. रसशोषणाऱ्या किडी - इमिडाक्लोप्रिड (१८.५ एस.सी.). किंवा फिप्रोनील (५ ई.सी.) बुरशीनाशक व कीटकनाशक आलटून पालटून आवश्यकतेनुसार फवारणी करावी.

#काढणी_व_उत्पादन:

- फळे लागल्यानंतर फळांचा पाण्याशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याशी फळांचा संपर्क आल्यास फळे सडतात.

- फळांचा आकार गोलसर व मधे फुगीर तयार होऊन देठ सुकल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूने पक्क फळावर वाजवल्यावर डबडब असाआवाज येतो तर अपक्व फळांचा टणटण असाआवाज येतो.कलिंगडाच्या देठाजवळील बाळी सुकते.

- साधारणपणे बियाणे लागवडीपासून  ९० ते १२० दिवसांमध्ये फळे काढणीस येतात.

- साधारणतः जातीनिहाय एकरी ३० ते ४९ टन उत्पादन मिळते.


#मार्गदर्शक_Swikruti_Agro

  

Swikruti Agro Clinic

 

#swikrutiagro #swikrutiagroclinic   #watermelon_planting   #swikruti_agro #watermelon #कलिंगड #टरबूज


 https://www.facebook.com/swikrutiagroclinic/


📞   https://bit.ly/2miyhzj

Sunday, November 1, 2020

#काकडी_लागवड


 #काकडी_लागवड 
#लागवड_कालावधी_व_जमीन : काकडीची लागवड उन्हाळ्यात सुरुवातीला जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जून - जुलै महिन्यात करतात. जास्त पावसाच्या भागात हिवाळ्याच्या सुरुवातीला सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात लागवड केली जाते.जमीन थोडी रेतीयुक्त असेल तर पिक चांगले येते.
#जाती - लागवडीसाठी फुले हेमांगी, फुले शुभांगी, जपान लॉंग ग्रीन, बलराम खीरा, प्रिय हे सुधारित वाण आहेत.
#खत_व्यवस्थापन : पूर्व मशागत करताना एकरी आठ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे.काकडी पिकाकरिता जमिनीतुन द्यावयाचे रासायनिक खत प्रमाण एकरी  (शिफारस) ४५ किलो युरिया,१२० किलो सुपर फाँस्फेट,३० किलो म्युरेट आँफ पोटश द्यावे.
-काकडीच्या जातीनुसार काकडीची लागवड ९० सेंमी अंतरावर टोकून करतात. दोन वेलींत ४५ सेंमी अंतर ठेवावे. लांब वेलींत ६० सेंमी अंतर ठेवावे एकरी अर्धा किलो बियाणे लागते.
-लागवडीनंतर एकरी  ७ व्या दिवशी साफ ५०० ग्राम + अक्टरा २५० मिली+ ह्यूमिक ५०० ग्राम आळवणी करावी १० व्या दिवसानंतर १९:१९:१९ - ३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ५ वेळेस द्यावे ३० व्या दिवसानंतर १२:६१:०० -३ किलो ३ वेळा द्यावे.आवश्यक खतमात्रा  कॅल्शिअम नायट्रेट २ किलो + बोरॉन २० टक्के ५०० ग्राम(१२:६१:००  ह्या विद्राव्य खतांसोबत देऊ नये ) ठिबकमधून १५ दिवसाच्या अंतराने २ वेळेस  द्यावे. ४० व्या दिवसापासून १२:६१:०० २ किलो +१३:००:४५ -२ किलो ५ वेळेस द्यावे  तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य २५ ग्राम १५ लिटरपाण्यात मिसळून फवारणी करावी.
#रोग_व_किडी : - रसशोषक  किडींसाठी इमिडेक्लोप्रीड फवारावे. फळमाशी प्रादुर्भाव नियंत्रणासाठी नुवोन २० मिली + गूळ ५० ग्राम १५ लीटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार फवारणी करावी.गुळाकडे फळमाशी आकर्षित होऊन नियंत्रण लवकर होण्यास मदत होते.प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर खराब झालेली फळे काढून टाकावी व नष्ट करावी. नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ४५ एस सी (Tracer) ७ मिलि किंवा सायंट्रेनिलिप्रोल १०.२६% ओ.डी.(Benevia) १५ मिलि १५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केवडा, भुरी या बुरशी जन्य रोगांसाठी साफ किंवा अवतार  फवारावे. एकच औषध पुन्हा पुन्हा न फवारता बदलून बदलून फवारावे. 
-सुमारे दीड महिन्याने काकड्या तोडणीस येतात अंदाजे १२ ते १५ तोडण्या होतात.
#उत्पादन :- एकरी सात ते दहा टन होते . 
-संकरीत काकडीचे वजन २०० ते २५० ग्रॅम भरते तर एकरी उत्पादन १२ ते १५ टन पर्यंत मिळते.
#काकडी_लागवड #फळमाशी.#रोग_व_किडी #खत_व्यवस्थापन #लागवड_कालावधी_व_जमीन  #उत्पादन  #cucumber_planting 
#swikrutiagroclinic 

Swikruti Agro Clinic

https://www.facebook.com/swikrutiagroclinic/

https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg

📞https://bit.ly/2miyhzj

Thursday, October 29, 2020

#सेंद्रिय_शेती

सेंद्रिय_शेतीच्या नावाखाली कंपनी प्रतिनिधी साखळी विपणन पद्धतीने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान पोहचवत असतात. 

सदर फोटो ( या सारख्या सेंद्रिय  विविध कंपनी आहेत )  मध्ये रोप व  दिवस यांची पडताळणी करावी . 

संदर्भासाठी खालील माहिती पडताळणी करा. 


https://m.facebook.com/story.php?story_fbid=2730979833661426&id=2170549573037791



Wednesday, October 28, 2020

#shetkari

 काळ्या मातीत बियाणे टाकून आस्मानी आणि सुलतानी संकटाचं चँलेंज स्वीकारायला शेतकऱ्यांचं काळीज असावं लागत!


#ओला_दुष्काळ 

#शेतकरी_वाचवा

https://www.facebook.com/swikrutiagroclinic/

#swikrutiagro #swikrutiagroclinic #Onion 



📱https://bit.ly/2miyhzj

Monday, October 26, 2020

#बटाट्याचे #एकरी #१८ #टन #उत्पादन

आधुनिक पद्धतीने शेती करीत बटाट्याचे एकरी १७ ते १८ टन इतके विक्रमी उत्पादन घेऊन तंत्रशुद्ध शेतीचा यशस्वी प्रयोग करून खोडद येथील अंगराज कुचिक यांनी भरघोस पीक घेतले आहे. हा आधुनिक यशस्वी प्रयोग पाहून परिसरातील अनेक शेतकरी बटाटा लागवडीकडे वळू लागले आहेत. एकरी १९ ते २० टन उत्पादन मिळवण्याचे कूचिक यांचे उद्दिष्ट होते.

हंगाम लागवडीची वेळ / काढणीची वेळ
खरीप जून अखेर ते जुलैचा पहिला आठवडा
सप्टेंबर-ऑक्टोबर
रब्बी ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबरचा दुसरा आठवडा -- फेब्रुवारी-मार्च
पुणे- नारायणगाव खोडद येथील प्रगतशील शेतकरी अंगराज कुचीक कुटुंबाचा वारसा घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करत एकरी १८ टन बटाट्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. कुचिक यांची नारायणगावपासून १० किलोमीटर अंतरावर खोडद येथे शेती आहे. ते आपल्या वडिलोपार्जित शेतीत एकच एक पीक घेत नाहीत. गवार, कोबी, बीट, कांदा, ऊस अशी विविध पिके घेतात.
त्यांच्या आजूबाजूला ऊस शेती असतानाही ते केवळ ऊस लागवड करण्याच्या फंदात पडत नाहीत. वर्षभर वेगवेगळी पिके घेऊन भरघोस उत्पादन घेतात.
बटाटा लागवडीविषयी कूचीक सांगतात की, लागवडीपासून काढणीपर्यंत अतिशय नियोजनबद्ध लक्ष दिले. यासाठी जमीन कोळपून घेऊन भुसभुशीत केली. त्यानंतर पुन्हा एकदा आलटून-पालटून घेतली.
जमीन भुसभुशीत केल्यामुळे बटाट्याची मुळे खोलपर्यंत जाण्यास मदत होते. बटाट्याची मुळे साधारणत: ३० ते ३५ सेंटिमीटपर्यंत खोल जातात. त्यामुळे बटाट्याची वाढ चांगली होऊन तो पोसण्यासाठी खोल नांगरट फायदेशीर ठरते.
१०:२६:००-१०० किलो + युरिया ५० किलो +पोटॅश ५० किलो + सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो या प्रमाणात खत मात्रा दिली. सहा इंच खोलीवर दोन बटाट्यांत नऊ ते दहा इंच व दोन ओळींत १५ इंच अंतर ठेवून लागवड केली. प्रमाणबद्ध पाण्याचे नियोजन केले दिवसाआड पाणी दिल्याने खताचे प्रमाण कमी लागले.
पिकांच्या संपूर्ण कालावधीत तीन वेळा कीटकनाशके व बुरशीनाशकाची फवारणी केली.लागवड करताना ती यांत्रिक पद्धतीने न करता मजूर लावूनच करून घेतली. लागवडीनंतर तण वाढू नये, यासाठी साधारणत: आठवडाभरात तणनाशक फवारले. व हलकीशी खुरपणी केली
त्यानंतर महिनाभराने एकरी ५ किलो कॅल्शिअम नायट्रेट व १० किलो मॅग्नेशिअम सल्फेट दिले. तसेच २० ते ४५ दिवसांच्या दरम्यान विद्राव्य खताची मात्रा दिली कोणतेही पीक घेताना पाण्याचे नियोजन करणे अतिशय महत्त्वाचे असते.
पिकाला वेळेवर आणि योग्य तेवढे पाणी मिळाले पाहिजे ज्या दिवशी ढगाळ हवामान असेल, त्या दिवशी तर पाणी देणे बंद ठेवले. या काळात पाणी बंद न ठेवल्यास ‘उशिराचा करपा’ येण्याची शक्यता असते. ढगाळ वातावरण जास्त दिवस राहिल्यास एकदम जास्त पाणी देणे फायद्याचे ठरते. त्यानंतर तीन-चार दिवस पाणी ठेवा. यामुळे करपा रोगाला दूर ठेवता येते. पोषक हवामान असतानाही पाण्याचे योग्य नियंत्रण केले, तर करपा रोगाचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. पीक स्वत:च त्याचा प्रतिकार करण्यास सक्षम बनते.
- संपूर्ण कालावधीत तीन वेळा कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी केली. सर्वसाधारणपणे पीक ३० दिवसांचे झाल्यावर पहिली, ४५ दिवसांचे झाल्यावर दुसरी व ५५ ते ६० दिवसांचे असताना आवश्यकतेनुसार तिसरी फवारणी केली.
५५ ते ६० दिवसांचे असताना आवश्यकतेनुसार तिसरी फवारणी केली,
-बटाटा पीक साधारणत: तीन ते साडतीन महिन्यांत काढणीस येते.
- काढणीआधी १५ दिवस अगोदर पाणी देणे बंद केले. याचा फायदा असा झाला की, बटाट्याची साल परिपक्व होण्यास मदत झाली आणि ओलसरपणाही कमी झाला. काढणीच्या चार ते पाच दिवस आधी पिकाची कापणी करून जमीन साफ केली. त्यानंतर लाकडी बळीराम घालून काढणी केली.

मार्गदर्शन - स्वीकृती आग्रो क्लिनिक













Thursday, November 14, 2019

https://www.facebook.com/swikrutiagroclinic

नमस्कार,शेतकरी बांधव आपल्या शेतीतील अनुभवातून इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी छोडासा प्रयत्न!

https://www.facebook.com/swikrutiagroclinic
@swikruti  
          

Monday, May 27, 2019

 


एक कष्टकरी कुटुंब मुलं-बाळांसहित दिवसभर उन्हात दगडांची तवे अनवाणी पायांनी तुडवत हा रानमेवा शोधत-जमा करत वन-वन फिरत राहतात. यांच्या घरची चूल सांच्याला कधी पेटते तर कधी नाही, म्हणजे पोटाला बसलेला हा भुकेचा चिमटा कधी सुटतो तर कधी नाही. तरी ओशाळला चेहऱ्यावर आनंदाचे खोटे ढग पांघरून हे कुटुंब रोज हि मेहनत सुरूच ठेवतो.
दिवसभर जमवलेला हा रानमेवा (करवंद) घेऊन घरचा धनी गावातल्या एकुलत्या एक लाल परीतून पहाटेच तालुका गाठतो. सकाळी सकाळी शाळेत जाणाऱ्या लेकरांच्या गर्दीत तो आपल्या लेकरांची चेहरे पाहत असतो. ते क्षणिक सुख अनुभवत असतानाच त्याच्या फाटक्या सदऱ्यातून जाणारा थंड वारा त्याला त्याच्या फाटक्या नशिबाची आठवण करून देत त्या स्वप्नीक दुनियेतून वास्तविकतेच्या काट्यात आणून सोडतो. कधी तरी हि परिस्थिती नक्कीच बदलेल अशी मनाची समजूत घालत आपल्या लेकरांना उज्वल भविष्य देण्यासाठी त्याचे सर्व वेडे प्रयत्न तो करत राहतो.
आपल्या अवती-भोवती पण आपल्याला असेच बरेच माय-बाप काहीनाकाही विकताना दिसली असतील! कधी आपल्याला गरज नसतानाही काही गोष्टी त्यांच्याकडून खरेदी करून त्यांच्या या वेड्या प्रयत्नांना साथ देऊन त्यांच्या दुःखाचे नाही तर नाही पण सुखाचे तरी प्रमाण होऊया.
https://www.facebook.com/swikrutiagroclinic/
https://wa.me/917769090592
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
https://www.instagram.com/swikruti.agro

Thursday, May 23, 2019

 
#कॅल्शियमची_कमतरता क्वचितच आढळते आणि बहुधा वालुकामय जमिनीत दुष्काळ सदृश्य परिस्थितीत दिसते.
  •  झपाट्याने वाढणार्‍या भागात लक्षणे प्रामुख्याने दिसतात.
  • नविन कोंब किंवा फांद्या नीट वाढत नाहीत
  • नवी पाने निस्तेज, गोळा झालेली असतात आणि कदाचित ओबड धोबडपणे पसरलेले पिवळे चट्टे देठ आणि पानांच्या करपलेल्या कडांवर दिसतात.
  • झाडांची मुळे असमाधानकारकपणे वाढतात, फांद्या कमी येऊन झाड एकशिडी दिसते आणि वाढ खुंटलेली असते.
  • फुले ओंझत नाहीत, फळे सामान्यतः पूर्णपणे विकसित होत नाहीत किंवा बुडाला कुजल्यासारखी लक्षणे दर्शवू शकतात.
  •  लक्षणे मुख्यत: झपाट्याने वाढणार्‍या पेशीत जसे नविन कोंब आणि पालवीत दिसतात. नविन फांद्या नीट वाढत नाहीत आणि काही काळाने त्यांची संख्याही कमी होते. सुरवातीला नविन आणि मध्यम वयस्कर पानांच्या भागांवर कदाचित ओबड धोबडपणे पसरलेले पिवळे चट्टे दिसतात. जर दुरुस्ती केली गेली नाही तर ती खालच्या बाजुला किंवा वरच्या बाजुला गोळा होतात आणि त्यांच्या कडांवर हळु हळु करपट चट्टे निर्माण होतात. प्रौढ आणि जुन्या पानांवर बहुधा काहीही परिणाम होत नाही. मुळे नीट वाढत नाहीत आणि झाडात मरगळ दिसते आणि वाढही खुंटलेली असते. खूपच जास्त कमतरता असल्यास फुले अकाली गळतात आणि नविन फांद्यांची टोक जळाल्यासारखी दिसतात किंवा वळतात. फळे बारीक आणि खाण्यायोग्य नसतात आणि काकडी, मिरची आणि टोमॅटोच्या बाबतीत, फळांच्या बुडाला कुज विकसित होते. बियाण्याची उगवण क्षमता कमी असते.
  • पिकांना खत देताना कॅल्शिअम युक्त खतांचा वापर करावा तसेच विद्रव्य खते कॅल्शिअम नायट्रेट ४५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून २ ते ३ वेळेस फवारणी करावी. 
  • swikruti agro #कॅल्शिअम नायट्रेट #अन्नद्रव्य_कमतरता
  • @swikruti agro clinic 
  • swikruti

Saturday, May 18, 2019


#शिमला_मिरची पिकामध्ये तुडतुडा बीटल पानांवर बारीक बंदुकीच्या गोळीसारखे छिद्र (१-२ मि.मी.) आणि खाल्याने नुकसानाची लक्षणे दिसतात.किड्यांचा रंग गडद असतो, काही वेळा ते चमकदार किंवा चकचकीत असतात..प्रौढ पाने खातात. पानांवर छोट्या विखुरलेल्या बंदुकीच्या गोळीच्या छिद्रांसारखी छिद्रे (१-२ मि. मी.) आणि पानाच्या कडेने चावल्यामुळे आरपार नसलेले खड्डे दिसतात. प्रादुर्भाव झालेल्या भागाच्या आजुबाजुला थोडा पिवळेपणा येऊ शकतो प्रादुर्भाव नियंत्रणासाठी इमीडाक्लोप्रिड ७०% डब्लूजी ६ ग्राम किंवा थियामिथोक्साम २५% डब्लूजी १५ मिली १० दिवसाच्या अंतराने आलटून-पालडून फवारणी करावी.
#शिमला मिरची #बीटल #
 swikruti agro clinic 
@swikrutiagro
 

Friday, May 17, 2019


#मिरची - फळकुज आणि फांद्या वाळणे
- मिरची पिकामध्ये कोलेटोट्रीकम या बुरशीमुळे फळकुज व फांद्या वाळणे हा प्रादुर्भाव होतो. दमट हवामानात रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात, फांद्या वाळणे या रोगाची सुरुवात शेंड्यापासून होते. प्रथम शेंडे मरतात.
- रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडे सुकून वाळतात, तसेच फांद्या आणि पानावर ठिपके दिसतात.
- रोगाची लक्षणे दिसताच शेंडे मोडून त्याचा नाश करावा.
- प्रादुर्भाव नियंत्रणासाठी मॅन्कोझेब ७५% डब्ल्यू पी किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% डब्ल्यू पी यापैकी एक ४० ते ४५ ग्रॅम १५ लीटर पाण्यात मिसळून रोग दिसताच १० ते १२ दिवसाच्या अंतराने ३ ते ४ वेळेस आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
https://www.facebook.com/swikrutiagroclinic/


https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg



फळांची गळ ही नैसर्गिक परिस्थिती, पाण्याची कमतरता,अन्नद्रव्य कमतरता,संजीवकांचा अभाव , रोग व किडीं प्रादुर्भाव या कारणामुळे होते.
#नैसर्गिक_फळगळ:
- बहरामध्ये फेब्रुवारी- मार्च महिन्यात फळधारणा झाल्यावर उष्ण तापमानात एकदम वाढ होऊन फळे गळतात, या कालावधीत दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असल्यामुळे नैसर्गिकरीत्या फळगळ होते.
#वातावरणाचा_परिणाम:
- तापमान, आर्द्रता आणि वारा या बाबी फळगळतीस कारणीभूत ठरतात. एप्रिल महिन्यात तापमानात झालेल्या वाढीमुळे हवेतील आर्द्रतासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बहराच्या फळांची गळ होते.
#अनियमित_पाणीपुरवठा:
-फळधारण झाल्यानंतर पाण्याचे कमी जास्त प्रमाणात पाण्याचा पुरवठा झाल्यास फळगळ होते .
-बागेत पावसाळ्यात पाणी साचून राहिल्यास फळांची गळ होते.
#रोग_व_किडी_प्रादुर्भाव :
-रोग व किडी प्रादुर्भाव झाल्यास खूप मोठ्या प्रमाणात फळगळ होते
- बुरशीची फुलांच्या बीजांडावर लागण होऊन फळांची गळ होते.
#सूक्ष्म_अन्नद्रव्य_कमतरता:
-जमिनीत चुना आणि जस्ताचे प्रमाण कमी असल्यास मोठ्या प्रमाणावर फळगळ होते
- झाडातील नैसर्गिक संजीवकांचे प्रमाण कमी झाल्यास फळांची गळ होते. या फळगळीमुळे मात्र उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.
#संत्रा_फळगळ_नियत्रंण_उपाययोजना:
१)खताचे व्यवस्थापन झाडाचे वय,वाढ शिफारशीनुसार योग्य प्रमाणात द्यावे,युरियाची मात्रा फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावी .
२)पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी झाडास द्यावे ठिबक सिचन असल्यास फायदेशीर ठरते.
३)पावसाळ्यात बागेत पाणी साचू देऊ नये,पाणी साचत असल्यास चर खणून पाणी काढून द्यावे.
४)किडी प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कीटकनाशक + गूळ मिसळून फवारणी करावी.खराब झालेली फळे काढून नष्ट करावी.
५)फळधारणा अवस्थेत असताना फळगळ नियंत्रणासाठी जिबरॅलिक असिड १.५ ग्राम + बाविस्टीन १०० ग्राम +युरिया १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून फळधारणेपासून ते फळकाढणी अगोदर १० दिवस १ महिन्याच्या अंतराने फवारणी करावी.
https://www.facebook.com/swikrutiagroclinic/



#डाळिंब पिकामध्ये एकरी ठिबकमध्ये १२ :६१:०० -४ किलो ४ दिवसाच्या अंतराने ६ वेळेस द्यावे फवारणीसाठी प्लानोफिक्स ५ मिली +सूक्ष्म अन्नद्रव्य २५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून १० दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. फुलातील स्ञी - केशरांपर्यंत वहनाच्या क्रियेत मधमाशी सहभागी असते. १) २०० ली. पाण्यात २ कि. गुळ व २-३ ली. ताक या प्रमाणात गर्भ कळीच्या अवस्थेपासुन ५-८दिवसांनी ३-४ फवारण्या कराव्यात.२) एका मडक्यात गुळ ५०० ग्रॅम व पानी ३-५ ली या प्रमाणात दूपारी बागेच्या आजुबाजुला ठेवावी.३) बागेच्या आसपास गाजर वा कांदयाचा बियाणे प्लॉट असल्यास मधमाशा आकर्षित होतात.४) बऱ्याच ठिकाणी बेदाणे झाडाला लटकवत ठेवुन मधमाशांना आकर्षित करण्यात येते.५) बागेतील काही झाडांच्या पानांना गावरान मध लावले असता मोठ्या प्रमाणात मधमाशी आकर्षित होते.
#swikrutiagroclinic #डाळिंब #फुलकळी
https://www.facebook.com/swikrutiagroclinic/ 
@swikrutiagro

Thursday, May 16, 2019

मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी प्रादुर्भाव:

#मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी प्रादुर्भाव:
*लष्करी अळीची ओळख आणि जीवनक्रम* :
- किडीचा पतंग करड्या रंगाचा असतो. मादी पतंग मक्याच्या पोंग्यात कोवळ्या पानांवर वरच्या बाजूने पुंजक्यात अंडी घालते. मादीचा सर्वसाधारण काळ १० दिवसाचा असतो. एक मादी सरासरी १२००-१८०० अंडी घालते.
- प्रथम अवस्थेतील अळी अंड्यातून बाहेर आल्यानंतर कोवळ्या पानावर उपजीविका करते. ही अवस्था साधारणपणे १४ ते २१ दिवसाची असते.
- वाढीच्या टप्प्यात अळीचा अंगावरील गडद ठिपके स्पष्ट दिसून येतात. तसेच डोक्यावर Y हे इंग्रजी अक्षर पांढऱ्या रंगात उलटा स्पष्ट दिसतो. ही अवस्था ३ ते ४ दिवसाची असते. नंतर अळी कोषावस्थेत जाण्यासाठी  जमिनीत शिरते.
*नुकसानीचा प्रकार:*
- ही किड मका पिकाचे पान खाऊन नुकसान करते. प्रथम अवस्थेत अळी कोवळ्या पानांवर उपजीविका करते. एका बाजूने खरडून खाल्ल्यामुळे पानावर पांढरे ठिपके दिसून येतात.
- दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेत पानाला छिद्रे पाडून पानाच्या कडेपासून शिरेकडे पाने खायला सुरुवात करतात.
- पोंग्यामध्ये असताना लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यास पान उघडल्यानंतर एकाच रेषेत गोल छिद्रे दिसून येतात. पूर्ण वाढ झालेल्या अळी अधाशीपणे झाडाची पाने खाऊन फक्त शिराच ठेवतात.
- मका पिकात सुरुवातीच्या काळात पोंग्यामध्ये प्रादुर्भाव कमी दिसतो
*एकात्मिक व्यवस्थापन*:
- मका पिकामध्ये शेतातील काडीकचरा, धसकटे वेचून नष्ट करावी, कारण त्यामध्येच ही अळी सुप्तावस्थेत राहते.
- पोंगे मर दिसताच मक्याची झाडे काढून नष्ट करावीत.
- किडीचा पतंगाला आकर्षित करून मारण्यासाठी एकरी एका प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
- लागवडीनंतर २० दिवसांनी फोरेटचे (१० टक्के) ५ ते ६ दाणे पोंग्यात टाकावे.
*रासायनिक नियंत्रण*:
- अळीच्या वाढीच्या पहिल्या अवस्थेमध्ये थायमेथोक्झाम १२.६ + लॅम्बडा सायहेलोथ्रीन ९.५ झेड सी% (अलिका १५ मिली)
- प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास (डायक्लोरोव्हास ७६% इ सी  + स्पिनोसॅड ४५% एस सी(नुवान २० मिली + ट्रेसर ७ मिली))
किंवा डेल्टामीथ्रीन ११% इ सी (डेसीस १५ मिली) आलटून पालटून ८ ते १० दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
- भुसा १० किलो + गूळ २ किलो एकत्र करून गोळे तयार करावे. त्यामध्ये थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू पी (लार्विन) १०० ग्रॅम मिसळून लहान गोळे तयार करून मक्याच्या पोंग्यात टाकावे.
@swikrutiagro