#मिरची - फळकुज आणि फांद्या वाळणे
- मिरची पिकामध्ये कोलेटोट्रीकम या बुरशीमुळे फळकुज व फांद्या वाळणे हा प्रादुर्भाव होतो. दमट हवामानात रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात, फांद्या वाळणे या रोगाची सुरुवात शेंड्यापासून होते. प्रथम शेंडे मरतात.
- रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडे सुकून वाळतात, तसेच फांद्या आणि पानावर ठिपके दिसतात.
- रोगाची लक्षणे दिसताच शेंडे मोडून त्याचा नाश करावा.
- प्रादुर्भाव नियंत्रणासाठी मॅन्कोझेब ७५% डब्ल्यू पी किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% डब्ल्यू पी यापैकी एक ४० ते ४५ ग्रॅम १५ लीटर पाण्यात मिसळून रोग दिसताच १० ते १२ दिवसाच्या अंतराने ३ ते ४ वेळेस आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
https://www.facebook.com/swikrutiagroclinic/
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg


No comments:
Post a Comment