आधुनिक पद्धतीने शेती करीत बटाट्याचे एकरी १७ ते १८ टन इतके विक्रमी उत्पादन घेऊन तंत्रशुद्ध शेतीचा यशस्वी प्रयोग करून खोडद येथील अंगराज कुचिक यांनी भरघोस पीक घेतले आहे. हा आधुनिक यशस्वी प्रयोग पाहून परिसरातील अनेक शेतकरी बटाटा लागवडीकडे वळू लागले आहेत. एकरी १९ ते २० टन उत्पादन मिळवण्याचे कूचिक यांचे उद्दिष्ट होते.
हंगाम लागवडीची वेळ / काढणीची वेळ
खरीप जून अखेर ते जुलैचा पहिला आठवडा
सप्टेंबर-ऑक्टोबर
रब्बी ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबरचा दुसरा आठवडा -- फेब्रुवारी-मार्च
पुणे- नारायणगाव खोडद येथील प्रगतशील शेतकरी अंगराज कुचीक कुटुंबाचा वारसा घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करत एकरी १८ टन बटाट्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. कुचिक यांची नारायणगावपासून १० किलोमीटर अंतरावर खोडद येथे शेती आहे. ते आपल्या वडिलोपार्जित शेतीत एकच एक पीक घेत नाहीत. गवार, कोबी, बीट, कांदा, ऊस अशी विविध पिके घेतात.
त्यांच्या आजूबाजूला ऊस शेती असतानाही ते केवळ ऊस लागवड करण्याच्या फंदात पडत नाहीत. वर्षभर वेगवेगळी पिके घेऊन भरघोस उत्पादन घेतात.
बटाटा लागवडीविषयी कूचीक सांगतात की, लागवडीपासून काढणीपर्यंत अतिशय नियोजनबद्ध लक्ष दिले. यासाठी जमीन कोळपून घेऊन भुसभुशीत केली. त्यानंतर पुन्हा एकदा आलटून-पालटून घेतली.
जमीन भुसभुशीत केल्यामुळे बटाट्याची मुळे खोलपर्यंत जाण्यास मदत होते. बटाट्याची मुळे साधारणत: ३० ते ३५ सेंटिमीटपर्यंत खोल जातात. त्यामुळे बटाट्याची वाढ चांगली होऊन तो पोसण्यासाठी खोल नांगरट फायदेशीर ठरते.
१०:२६:००-१०० किलो + युरिया ५० किलो +पोटॅश ५० किलो + सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो या प्रमाणात खत मात्रा दिली. सहा इंच खोलीवर दोन बटाट्यांत नऊ ते दहा इंच व दोन ओळींत १५ इंच अंतर ठेवून लागवड केली. प्रमाणबद्ध पाण्याचे नियोजन केले दिवसाआड पाणी दिल्याने खताचे प्रमाण कमी लागले.
पिकांच्या संपूर्ण कालावधीत तीन वेळा कीटकनाशके व बुरशीनाशकाची फवारणी केली.लागवड करताना ती यांत्रिक पद्धतीने न करता मजूर लावूनच करून घेतली. लागवडीनंतर तण वाढू नये, यासाठी साधारणत: आठवडाभरात तणनाशक फवारले. व हलकीशी खुरपणी केली
त्यानंतर महिनाभराने एकरी ५ किलो कॅल्शिअम नायट्रेट व १० किलो मॅग्नेशिअम सल्फेट दिले. तसेच २० ते ४५ दिवसांच्या दरम्यान विद्राव्य खताची मात्रा दिली कोणतेही पीक घेताना पाण्याचे नियोजन करणे अतिशय महत्त्वाचे असते.
पिकाला वेळेवर आणि योग्य तेवढे पाणी मिळाले पाहिजे ज्या दिवशी ढगाळ हवामान असेल, त्या दिवशी तर पाणी देणे बंद ठेवले. या काळात पाणी बंद न ठेवल्यास ‘उशिराचा करपा’ येण्याची शक्यता असते. ढगाळ वातावरण जास्त दिवस राहिल्यास एकदम जास्त पाणी देणे फायद्याचे ठरते. त्यानंतर तीन-चार दिवस पाणी ठेवा. यामुळे करपा रोगाला दूर ठेवता येते. पोषक हवामान असतानाही पाण्याचे योग्य नियंत्रण केले, तर करपा रोगाचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. पीक स्वत:च त्याचा प्रतिकार करण्यास सक्षम बनते.
- संपूर्ण कालावधीत तीन वेळा कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी केली. सर्वसाधारणपणे पीक ३० दिवसांचे झाल्यावर पहिली, ४५ दिवसांचे झाल्यावर दुसरी व ५५ ते ६० दिवसांचे असताना आवश्यकतेनुसार तिसरी फवारणी केली.
५५ ते ६० दिवसांचे असताना आवश्यकतेनुसार तिसरी फवारणी केली,
-बटाटा पीक साधारणत: तीन ते साडतीन महिन्यांत काढणीस येते.
- काढणीआधी १५ दिवस अगोदर पाणी देणे बंद केले. याचा फायदा असा झाला की, बटाट्याची साल परिपक्व होण्यास मदत झाली आणि ओलसरपणाही कमी झाला. काढणीच्या चार ते पाच दिवस आधी पिकाची कापणी करून जमीन साफ केली. त्यानंतर लाकडी बळीराम घालून काढणी केली.
मार्गदर्शन - स्वीकृती आग्रो क्लिनिक